- राज्यपालांनी केले अपूर्ण वसतीगृहाचे उद्घाटन
- वंदे मातरम् ची सक्ती, काँग्रेसचा जय बळीराजाचा नारा
- सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला पुन्हा धक्का
- विनायक मेटेंच्या पत्नीने सोडलं मौन, अपघाताच्या चौकशीची मागणी
- मोठी बातमी : रस्त्या अभावी घरीच प्रसुती, जुळ्या बाळांचा मृत्यू, आईला झ़ोळीतून नेले
- मोठी बातमी : FIFA कडून अखिल भारतीय फुटबॉल महासंघ(AIFF)निलंबित
- स्लॅब कोसळून ज्येष्ठ दांपत्याचा मृत्यू
- अंबानी कुटूंबियांना जिवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
- विनायक मेटे यांचा अपघात की घातपात? चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य
- कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना महिलेनं अडवलं ; पोलिसांविरोधात महिलेची तक्रार

हर घर तिरंगा उपक्रमावरुन निखिल वागळे यांचा सरकारला टोला
X
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अशी मोहीम घोषित केली आहे. १५ ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशातील नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. पण आता या आवाहनावरुन मोदी सरकारवर टीका देखील होऊ लागली आहे.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी यावरुन मोदी सरकारला टोला लगावला आहे, निखिल वागळे यांनी हर घर तिरंगा, सुरूवात तुमच्या शाखांपासून करा, असा उपरोधिक टोला आपल्या फेसबुक पोस्टमधून लगावला आहे.
तर दुसरीकडे डॉ. संग्राम पाटील यांनीही या मोहीमेवरुन मोदी सरकारला चिमटे काढले आहेत. "माझे लाडके नेते जवाहरलाल नेहरू यांचा तिरंगा हातात घेतलेला फोटो पाठवत आहे ,ज्यांना सावरकर, गोळवलकर यांचा अभिमान आहे त्यांनी त्यांचा हातात तिरंगा घेतलेला फोटो शेअर करावा" असे आवाहन केले आहे.
एकूण राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही यावरुन आता टीकाकारांनी लक्ष्य केले आहे.