Home > News Update > 'अर्णब' प्रकरणात राज्यपालांची उडी

'अर्णब' प्रकरणात राज्यपालांची उडी

Governor koshyari enters in Arnab arrest matter calls home minister

अर्णब प्रकरणात राज्यपालांची उडी
X

वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणावरून अर्णब गोस्वामी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. भारतीय जनता पार्टी संपूर्णपणे गोस्वामी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली असताना.

अर्णब यांच्या अटकप्रकरणी कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला आहे. कोश्यारी यांनी गृहमंत्र्यांसोबत अर्णब यांच्याबाबत चर्चा केली.अर्णब यांच्या सुरक्षा आणि आरोग्याबाबत कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसंच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली.

अर्णब यांच्याशी संबंधित दोन सुनावण्या होणार आहेत.यातील एक सुनावणी मुंबई हायकोर्टात तर दुसरी सुनावणी अलिबाग कोर्टात होणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. ही अटक अवैध असल्याचं सांगत आपल्याविरोधातील FIR रद्द करण्यात यावा. तसंच तत्काळ जामीन मिळावा, या मागणीसाठी अर्णब यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

तसंच दुसरी सुनावणी अलिबाग न्यायालयात होईल. अन्वय नाईक प्रकरणात अलिबाग न्यायालयाने अर्णब यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. पण त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी अलिबाग पोलिसांनी केली होती. या अर्जावरही आज सुनावणी होईल.

दरम्यान, अर्णब यांना रविवारी रायगड जिल्ह्यातील तळोजा जेलमध्ये हलवण्यात आलं. त्याआधी तीन रात्री त्यांना अलिबाग मधल्या एका शाळेमध्ये ठेवण्यात आलं होतं, ते कैद्यांसाठीचं क्वारंटाईन सेंटर होतं. या दरम्यान त्यांच्या अटकेविरोधात त्यांच्या वकिलांनी केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने शनिवारी निर्णय राखीव ठेवला. आज तरी अर्णव गोस्वामी ताजा मी होणार का हे सर्वस्वी न्यायालयावर अवलंबून आहे.

Updated : 9 Nov 2020 9:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top