Home > News Update > 'पंजाब आणि पंजाबींची बदनामी थांबवा':निवडणुकीपुर्वी मनमोहन सिंगांनी भाजपवर तोफ डागली

'पंजाब आणि पंजाबींची बदनामी थांबवा':निवडणुकीपुर्वी मनमोहन सिंगांनी भाजपवर तोफ डागली

``ज्यांच्या शौर्यासाठी आणि देशभक्तीसाठी जगभरातून ज्या पंजाबींना सलाम केला जातो त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणीत केंद्र सरकाने पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या नावाखाली पंजाबचे मुख्यमंत्री आणि राज्यातील लोकांची बदनामी केली आहे. ते ऐवढ्यावरच थांबले नाही तर शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी पंजाब आणि पंजाबींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. एक सच्चा भारतीय असल्याने, पंजाबमध्ये जन्म घेतल्यामुळे, आता जे घडत आहे त्याबद्दल मला वाईट वाटते. अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भाजपवर तोफ डागली आहे."

पंजाब आणि पंजाबींची बदनामी थांबवा:निवडणुकीपुर्वी मनमोहन सिंगांनी भाजपवर तोफ डागली
X

``ज्यांच्या शौर्यासाठी आणि देशभक्तीसाठी जगभरातून ज्या पंजाबींना सलाम केला जातो त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणीत केंद्र सरकाने पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या नावाखाली पंजाबचे मुख्यमंत्री आणि राज्यातील लोकांची बदनामी केली आहे. ते ऐवढ्यावरच थांबले नाही तर शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी पंजाब आणि पंजाबींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. एक सच्चा भारतीय असल्याने, पंजाबमध्ये जन्म घेतल्यामुळे, आता जे घडत आहे त्याबद्दल मला वाईट वाटते. अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भाजपवर तोफ डागली आहे."


विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हिडिओ लिंकद्वारे पंजाबमधील जनतेला संबोधित करताना, त्या ंनी भाजपच्या "विभाजनाच्या धोरणां" विरोधात सावध करत पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आणि केंद्रातील सरकारवर आरोप केले. "पंजाब आणि पंजाबींना बदनामी थांबवा`` असं म्हटलं आहे.

पंजाबी भाषेतील एका व्हिडिओ संदेशात सिंग म्हणाले की, केंद्राने पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या नावाखाली पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि राज्यातील लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी पंजाब आणि पंजाबींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शौर्यासाठी आणि देशभक्तीसाठी जगभरातून ज्या पंजाबींना सलाम केला जातो त्यांच्याबद्दल जे काही बोलले त्याचा एक सच्चा भारतीय असल्याने, पंजाबमध्ये जन्म घेतल्यानंतर, आता जे घडत आहे त्याबद्दल मला वाईट वाटते."

विकास, शेती आणि बेरोजगारी ही पंजाबसमोरील "आव्हाने" असल्याचे सांगत, ते म्हणाले की या प्रश्नांवर काँग्रेस " योग्य उपाय" देऊ शकतो.

त्यांनी भाजपवर निशाणा साधताना सिंह यांनी अनेक मुद्द्यांवर लक्ष वेधले. नेहरूंवर सत्ताधारी पक्षाचे हल्ले, अर्थव्यवस्थेवर आणि पंतप्रधान या नात्याने त्यांनी "स्वतः बोलण्यापेक्षा" त्यांच्या साडेसात वर्षाच्या कामाला बोलू द्यावे असं म्हटलं आहे.

"सध्याचे राज्यकर्ते साडेसात वर्षांच्या कारकिर्दीनंतरही आपल्या चुका मान्य करून सुधारणा करण्याऐवजी, जनतेच्या समस्यांसाठी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत आहेत. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी देश आणि इतिहासाला दोष देता येत नाही. 10 वर्षे पंतप्रधान म्हणून काम केल्यानंतर मी स्वत: बोलण्यापेक्षा माझे काम माझ्यासाठी बोलू देणे पसंत केले. आम्ही राजकीय फायद्यासाठी देशाचे विभाजन केले नाही. आम्ही सत्य झाकण्याचा प्रयत्न केला नाही. आणि पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी होईल असे काहीही केले नाही. अडचणींचा सामना करूनही आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा आणि देशवासीयांचा गौरव केला. मला आनंद आहे की भाजप आणि त्यांच्या बी आणि सी टीमचा माझ्याविरुद्धचा अपप्रचार उघड झाला आहे . 2004 ते 2014 या काळात आम्ही केलेल्या चांगल्या कामांची देशाला आठवण राहील, असेही त्यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेबाबत ते म्हणाले, "सरकारला अर्थशास्त्र कळत नाही. त्यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, शेतकरी आणि उद्योजक, महिला, विद्यार्थी या सर्वांनाच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अन्नदातांना (शेतकऱ्यांना) उदरनिर्वाह करणे कठीण जात आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत आहेत. पण सर्व काही ठीक आहे हे दाखवण्यासाठी सरकार डेटाची फसवणूक करत आहे. इस सरकार की नीयत और नीती दोनो में खोत है (या सरकारचा हेतू आणि धोरणे सदोष आहेत). त्याची धोरणे स्वार्थाने चालविली जातात आणि द्वेषाने उद्दिष्ट असतात. जात, पंथ आणि प्रदेशाच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडत आहे. त्यांचा खोटा राष्ट्रवाद जितका पोकळ आहे तितकाच धोकादायक आहे... घटनात्मक संस्था कमकुवत होत आहेत.

केंद्राच्या परराष्ट्र धोरणावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आणि ते म्हणाले, "गेल्या एक वर्षापासून चिनी लोक आमच्या भूमीत घुसखोरी करत आहेत, पण ते लपवले जात आहे. जुने मित्र आपल्यापासून दूर जात आहेत. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले नसले तरी, पंतप्रधानांच्या 2015 च्या पाकिस्तान दौऱ्याच्या स्पष्ट संदर्भात सिंग म्हणाले, "मला आशा आहे की सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आता हे समजले असेल की राजकारण्यांना मिठी मारून संबंध सुधारत नाहीत, किंवा आमंत्रण न देता बिर्याणी खायला जाण्यामुळे परराष्ट्र धोरण सक्षम होत नाही."

Updated : 18 Feb 2022 2:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top