Home > News Update > साखरसंघाकडे जसे लक्ष देता तसे गोरगरिबांसाठी असलेल्या महामंडळाकडे का देत नाही- माजी मंत्री ढोबळे

साखरसंघाकडे जसे लक्ष देता तसे गोरगरिबांसाठी असलेल्या महामंडळाकडे का देत नाही- माजी मंत्री ढोबळे

साखरसंघाकडे जसे लक्ष देता तसे गोरगरिबांसाठी असलेल्या महामंडळाकडे का देत नाही- माजी मंत्री ढोबळे
X

अहमदनगर : धनगर समाज, मराठा समाज,लिंगायत, मुस्लिम समाजाने त्यांना आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलन केली, प्रसंगी टोकाचा संघर्ष केला, मात्र शासन- प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. राज्य सरकार केवळ स्वतः पुरतेच बघते, साखरसंघाकडे ज्यापध्दतीने लक्ष देता त्या पद्धतीने गोरगरिबांसाठी असलेले महामंडळ चालवण्यासाठी का लक्ष देत नाही असा सवाल माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी उपस्थित केला ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणासाठी जी सर्वपक्षीय बैठक बोलावली त्यातून निश्चितच मार्ग निघेल असा विश्वास ढोबळे यांनी यावेळी व्यक्त केला.

बहुजन रयत परिषदची रॅली अहमदनगर येथे आली असता शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ढोबळे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बहुजन रयत परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष कोमल साळुंखे, प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, नारायण साठे, शंकर तडाके, दादा सोनवणे, अशोक जाधव ,यांच्या सह पदाधिकारी - कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री ढोबळे म्हणाले की, आरक्षणाचा तिढा सुटायला तयार नाही. आरक्षण मिळावे यासाठी चार समाजाने टोकाचे पाऊल उचलले, संघर्ष केला, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली.सरकार त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सोबतच राज्यात आज जी महामंडळे बंद आहे त्यामुळे गोरगरीब जनतेचे हाल होत आहे, या महामंडळासाठी निधी द्यायला सरकार तयार नाही, त्यामुळे केंद्राचा पैसा या महामंडळांना मिळू शकत नाही, राज्य सरकार ज्या पद्धतीने साखर कारखानदारी कडे लक्ष देते,त्या पद्धतीने या महामंडळाकडे लक्ष देत नाही असा आरोपही त्यांनी केला. ही महामंडळे गोरगरिबांसाठी आहेत की केवळ कर्मचारी जगवण्यासाठी असा प्रश्न पडतो असं ढोबळे म्हणाले. अनुसूचित जाती जमाती मधील भटक्या-विमुक्त प्रमाणे अ ब क ड प्रवर्ग लागू करावा ही मागणी आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत, आता देशातील आठ राज्यात या मागणीसाठी जोर धरला आहे असं ते म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन होत नाही, दोन दिवसात अधिवेशन गुंडाळले जाते , त्यामुळे अगोदर विधानसभेचा वर्ग सुरळीत भरवा मगच बालवाडीचा वर्ग भरावा असा टोला त्यांनी लगावला.

बहुजन रयत परिषदेने सुरू केलेली ही यात्रा शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन निघालो आहोत, जो आपल्याला मदत करतो त्याला हात जोडा हा विचार घेऊन आम्ही समाजापर्यंत गेलो, समाजात जनजागृती केली. गोर गरीब समाजाची पथसंस्था ही त्याच्या दारासमोरील शेळी व कोंबडी आहे हे त्यांना पटवून सांगितले. असं ढोबळे यांनी म्हटले आहे.

गेल्या अठरा वर्षांपासून साळवे आयोगाच्या 82 शिफारशी या शासनाकडे धूळखात पडून आहे, शासन स्तरावर तो विषय मार्गी लागायला तयार नाही , त्या शिफारसी लागू करून मातंग समाजाला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Updated : 30 Aug 2021 7:04 PM IST
Next Story
Share it
Top