पूरग्रस्तांना अजूनही मदत नाही, रास्ता रोको करुन सरकारला इशारा
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 Oct 2021 11:52 AM GMT
X
X
सांगली जिल्ह्यात या काही महिन्यांपीर्वी आलेल्या महापुराने हजारो लोकांना फटका बसला आहे. पण या पूरग्रस्तांना अजूनही मदत मिळालेली नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांच्या नेतृत्वाखाली पुरग्रस्तांनी सांगलीत आंदोलन केले. सांगली - कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको करत पूरग्रस्तांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक पूरबधितांनी अजूनही मदत मिळाली नसल्याची तक्रार केली आहे, तर अनेकांनी तुटपुंजी मदत मिळाल्याचे सांगत हे आंदोलन केले. या आंदोलनामुळे सांगली कोल्हापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
Updated : 29 Oct 2021 11:52 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire