Home > News Update > महाविकास आघाडीकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल...!

महाविकास आघाडीकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल...!

महाविकास आघाडीकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल...!
X

महाविकास आघाडीकडून नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते विकास ठाकरे यांचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार आणि विरोधी पक्षनेते नाना पटोले यांच्या सह अनेक नेत्यांच्या प्रमु्ख उपस्थितीत सकाळी व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्याला आदरांजली अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर विकास ठाकरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला.


प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसचे एक पाऊल पुढे, पवार व ठाकरेंनी आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा: नाना पटोले

महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात दोन जागांवर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत. काँग्रेस पक्षाकडे या जागांसाठी चांगले उमेदवार आहेत. सांगली जे झालं ते बरोबर झालं नाही. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.






‘हायवे मॅन’ सिनेमाप्रमाणे गडकरीही निवडणुकीत फ्लॉप होणार, देशाला गांधी विचाराची गरज

भाजपाचा नागपूरमध्ये कोण उमेदवार आहे हे महत्वाचे नसून ही लढाई विचाराची आहे. हायवे मॅन चित्रपट फ्लॉप झाला, मोदींवर काढलेला चित्रपटही फ्लॉप झाला पण मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट मात्र सुपरहिट झाला होता. आज जनतेला गांधी विचाराची आवश्यकता आहे. विकासाच्या नावाखाली नागपूरचे बेहाल करुन ठेवले आहेत. नेमका कोणाचा विकास झाला? कुठे गेले मिहान? मालवाहतुक करणारी विमाने उतरतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, या आश्वासनांचे काय झाले. नागपूर शहरात सिमेंटचे रस्ते बनवले आहेत, आधीच नागपुरात जास्त तपमान व आता सीमेंटचे रस्ते यामुळे तापमान आणखी वाढणारच. स्थानिक मुद्द्यांबरोबरच राष्ट्रीय मुदद्यांवरही या निवडणुकीत भर दिला जाणार आहे. काँग्रेस पक्षात एकजूट असून नागपूरमधून काँग्रेस व महाविकास आघाडीचा उमेदवार २.५ लाख मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

देशाचे संविधान व लोकशाही टिकवणे हे सर्वांचे काम आहे

नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशाचे संविधान व लोकशाही टिकवणे हे सर्वांचे काम आहे. आताची निवडणूक ही देश वाचवण्यासाठी आहे. भाजपाचा पराभव करणे हाच मुख्य उद्देश आहे. महाविकास आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव करेल. मागील १० वर्षात भाजपाने खोटी आश्वासने देऊन देशाला बरबाद केले त्याचा उगम हा नागपुरच आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले आहे. देशावर कर्जाचा मोठा डोंगर करून ठेवला आहे. जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही, असा टोला नाना पटोले यांनी यावेळी लगावला.

Updated : 26 March 2024 5:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top