'शेवटी ते राजे आहेत उदयन राजेंच्या सर्व इच्छा पुर्ण करु' - चंद्रकांत पाटील
Max Maharashtra | 31 Aug 2019 10:32 AM GMT
X
X
पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असेल ती देखील पूर्ण होईल शेवटी ते राजे आहेत अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर वक्तव्य केले आहे तर नारायण राणे यांच्या संदर्भात बोलताना राणेंचा विषय इतका मोठा आहे की तो माझ्या ताकदीच्या बाहेरचा विषय आहे. त्याबाबतचा निर्णय घ्यायला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा समर्थ आहेत असा टोला पाटील यानी लगावला.
युतीच्या जागावाटपाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे घेतील
जो जो पक्षात येईल त्या सगळ्याचं स्वागतच आहे फक्त त्यांच्यावर कुठले गंभीर गु्न्हे दाखल नसावेत, आरोप नसावेत, त्यांना कुठला शब्द दिला जाणार नाही ज्यांची चर्चा आहे ते सगळे १ सप्टेबरला भाजपात येणार आणि त्यानंतरही भाजप मध्ये येणारे येतच राहतील गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात भाजप शिवसेने बाबत विश्वास लोकांमध्ये निर्माण झालाय आपल्या मतदारसंघात विकास व्हावा आपले अजेंडे पूर्ण व्हावे या अपेक्षे ने लोक भाजप मध्ये येत असल्याचे पाटील म्हणाले त्यांचं स्वागत आहे असून त्यांचे राजिनामे वगैरे अशा तांत्रिक बाबी लक्षात घेऊन त्यांचे प्रवेश होतील असे पाटील म्हणाले.
Updated : 31 Aug 2019 10:32 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire