Home > News Update > जळगावात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल

जळगावात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल

पावसाने दडी मारल्याने जळगावातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यातच कपाशी पिकावर करपा पडल्याने शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढावलं आहे.

जळगावात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल
X

जळगाव जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड केली. सुरूवातीला पावसाच्या दमदार आगमनामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होते, कपाशी चांगल्या पध्दतीने उगवले. मात्र, नंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

पावसाने अचानक उघडीप दिल्याने कपाशीचे पीक जळू लागले आहे. सुरवातीच्या जोरदार पावसामुळे विहीरीत पाणी होते,त्या पाण्याच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करत कपाशी लागवड केली, परंतु आता पावसाने दडी मारल्यामुळे आता विहिरीत देखील पाणी शिल्लक नसल्याने उभे पीक जळून जातांना पाहण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी हतबल झाला असतांना दुसरीकडे आता कपाशीवर करपा रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने बळीराजावर दुहेरी संकट कोसळले आहे.पिकांवर करपा पडल्याने शेतकऱ्यांनी फवारणी देखील केली मात्र, तरी देखील पिकांवरील करपा हटत नसल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदा

कपाशीला केलेला लागवड खर्च देखील निघेल की नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे.

Updated : 10 Aug 2021 8:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top