#FarmerProtest : वर्ध्यात सत्याग्रह करणाऱ्या शेतकऱ्यांचा मंडप प्रशासनाने हटवला
प्रणय ढोले | 7 Jun 2021 12:38 PM GMT
X
X
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ६ महिने पूर्ण झाले आहेत. कोरोना संकट असले तरी शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन बसले आहेत. या शेतकऱ्यांना देशभरातून पाठिंबा मिळतोय. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातही गेल्या १७५ दिवसांपासून या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सत्याग्रह आंदोलन सुरू आहे.
मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने या आंदोलनाचा मंडप १३२ व्या दिवशी काढून टाकला. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. पण दुसरीकडे राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंदोलकांचे नेमके म्हणणे काय आहे ते जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी प्रणय ढोले यांनी...
Updated : 7 Jun 2021 12:38 PM GMT
Tags: Farmer Protest Vardha
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire