Home > News Update > शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी मंत्रालयासमोर करणार महाआरती

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी मंत्रालयासमोर करणार महाआरती

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी मंत्रालयासमोर करणार महाआरती
X

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे, जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे भोंगे बंद व्हावेत, शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला कळाव्या म्हणून 4 मे रोजी मुंबईमध्ये मंत्रालयात जवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर शेतकरी विनायकराव पाटील शेतकऱ्यांच्या वेदनांची महाआरती करणार आहेत.

शेतकऱ्यांकडून धान्य फळ भाजीपाला भेट देऊन तेलंगणा च्या धर्तीवर मदत करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या घरासमोर शांततेच्या मार्गाने महाआरती करणार आहेत, आज मुंबईत झालेल्या पत्रकार परीषदेत विनायकराव पाटील आणि माणिक कदम यांनी दिली. तसेच मुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांना, सर्व जाती-धर्माच्या शेतकऱ्यांना घाम गाळून पिकविलेले धान्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या गरीब मुलांच्या हस्ते देणार व शिवरायांच्या जनतेला शांततेने व सुखाने महागाईचा सामना करीत जगू द्या, ही विनंती शेतकऱ्यांच्या वतीने सर्व नेत्यांना करणार आहेत.

सध्या राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर भ्रष्टाचाराचे व जातीवादाचे आरोप करून भांडत आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्याने कोणाकडे न्याय मागावे हेच कळत नाही. भोंगे,हनुमान चालीसा, हिंदू मुस्लिम हे शेतकऱ्यांचे मुद्दे नाहीत शेतमालाला हमी भाव नाही, वीज नीट चालत नाही, ऊसाचा प्रश्न गंभीर झालाय व दररोज होणारी इंधन वाढ व महागाई या मुळे शेतकरी चिंतेत आहे .राजकीय संघर्षाच्या गोंधळामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कोणाचेच लक्ष नाही शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला कळाव्या म्हणून दि.4 मे 2022 रोजी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यासमोर शेतकऱ्यांचा वेदनांची महाआरती करण्यात येणार आहे तरी सर्व शेतकर्यांना विनंती की आपण या वेदनांच्या महाआरती मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आलं आहे.

Updated : 3 May 2022 10:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top