Home > News Update > 'फडणवीस सरकार उच्चभ्रू बाबांवर कारवाई करत नाही' - श्याम मानव

'फडणवीस सरकार उच्चभ्रू बाबांवर कारवाई करत नाही' - श्याम मानव

फडणवीस सरकार उच्चभ्रू बाबांवर कारवाई करत नाही - श्याम मानव
X

2005 साली जेव्हा जादूटोणा विरोधी कायदा झाला त्यावेळी उच्चभ्रू बाबांवर कारवाई होणार नाही, असा आरोप तत्कालीन आदिवासी समाजाच्या सामाजिक राज्य मंत्र्यांनी केला होता. त्यावेळी मला ते खोटे वाटत होते. आता मात्र देवेंद्र फडणवीस सरकारचे कृत्य पाहतो, तेव्हा उच्चभ्रू, ब्राह्मण जातीत जन्माला आलेले जे बाबा आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही. असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी केला आहे

श्याम मानव म्हणाले की "सर्वसाधारण किंवा आदिवासी जातीत जन्माला आलेल्या बाबांवर सरकार सहज कारवाई करते, वीरेंद्र कृष्ण महाराज यांनी एका व्हिडिओत हम ब्राह्मण हैं, ये अछूत छूना मत असे म्हटल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. देशात अट्रोसिटी कायदा आहे, असे म्हणणारा माणूस महाराष्ट्रात येतो, जादूटोणा विरोधी कायद्याचे व ड्रग्ज रेमेडीज कायद्याचे उल्लंघन करतो, उच्चभ्रू, ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्या बाबांवर सरकार कारवाई करत नाही, असही श्याम मानव म्हणाले आहेत.



Updated : 31 Jan 2024 7:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top