Home > News Update > भारतमाता की जय! आणि राष्ट्रवादाचा अतिरेकी वापर – मनमोहन सिंह

भारतमाता की जय! आणि राष्ट्रवादाचा अतिरेकी वापर – मनमोहन सिंह

भारतमाता की जय! आणि राष्ट्रवादाचा अतिरेकी वापर – मनमोहन सिंह
X

पुरुषोत्तम अग्रवाल आणि राधाकृष्ण यांच्या ‘हू इज भारतमाता’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी भाजपला चांगलेच खडे बोल सुनावले. ‘देशातील काही घटकांनी राजकीय फायद्यासाठी भारताची प्रतिमा ही कट्टर किंवा उग्र कशी करता येईल यावर भर दिला’ असं म्हणत मनमोहन सिंह यांनी भारतमाता की जय! या घोषणेचा एका विशिष्ट वर्गाकडून राजकीय फायद्यासाठी अतिरेकी वापर केला अशी टीका केली आहे.

या वेळी मनमोहन सिंह यांनी अलिकडे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर होत असलेल्या टीकेवर भाष्य करताना “भारत हा लोकशाही स्वीकारलेला देश आहे. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु होते. आपल्या देशाला जगाने एक मोठी शक्ती मानलं आहे. या देशासाठी पंडित नेहरुंनी दिलेलं योगदान विसरुन चालणार नाही.” याची जाणीव करुन दिली.

आधुनिक भारताची मुहूर्तमेढ रोवताना पंडित नेहरु यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख देखील यावेळी मनमोहन सिंह यांनी केला.

“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशात काही काळ अस्थिरता होती. अशा काळात पंडित नेहरुंनी या देशाचं नेतृत्व केलं. देशाला एक दिशा देण्याचं काम केलं. आधुनिक भारताची मुहूर्तमेढ ही पंडित नेहरुंनी रोवली. भारतातील विद्यापीठं, शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक प्रगती यांचा पाया रचणारे पंडित नेहरुच होते. त्यांचं या देशासाठीचं योगदान कधीही विसरता येणार नाही.

देशातले काही घटक असे आहेत ज्यांना पंडित नेहरुंबाबत अनादर आहे. त्यांना इतिहास ठाऊक नाही. त्यामुळे ते कायमच पंडित नेहरुंची प्रतिमा मलीन करण्याचे काम करतात. त्यांच्या मनात नेहरुंबाबत जो पूर्वग्रह आहे तेच सत्य आहे असं ते मानून चालतात.” असं म्हणत मनमोहन सिंह यांनी अलिकडच्या काळात नेहरुंबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या खोट्य़ा बाबींवर भाष्य केलं.

Updated : 23 Feb 2020 5:21 AM GMT
Next Story
Share it
Top