Home > News Update > अमरावतीत येऊन किरीट सोमय्या यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का?- यशोमती ठाकूर

अमरावतीत येऊन किरीट सोमय्या यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का?- यशोमती ठाकूर

अमरावतीत येऊन किरीट सोमय्या यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का?-  यशोमती ठाकूर
X

अमरावती : अमरावती शहरात झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीसाठी कोण जबाबदारी आहे, याबाबत अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या हिसांचाराबाबत काल अनेक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली. तसेच भाजप नेत्यांनीच ही दंगल घडवून आणल्याची टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही अमरावती दौरा करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र किरीट सोमय्या यांना अमरावतीत येऊन पुन्हा दंगल भडकवायची आहे का?, असा सवाल अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

भाजप नेते सोमय्या यांनी उद्या अमरावती दौरा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. सोमय्या यांनी अजून 15 दिवस तरी अमरावतीत येऊ नये, असा सल्ला ठाकूर यांनी दिला. तसेच अमरावतीत येऊन त्यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.

Updated : 16 Nov 2021 11:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top