Home > News Update > देवगड हापूसला मालवी मॅंगोची टक्कर

देवगड हापूसला मालवी मॅंगोची टक्कर

देवगड हापूसला मालवी मॅंगोची टक्कर
X

देवगड हापूसची (Devgad Alfonso)परदेशी आवृत्ती म्हणून ओळखला जाणारा मालवी आंबा (Malvi Mango) उद्या नवीमुंबई एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) दाखल होणार आहे. आफ्रिकेतून मालवी आंब्याची आयात सुरू झाल्यापासून, प्रथमच दर 1,500 रुपये प्रति किलो इतका आहे. पेट्रोलचे शुल्क, हवाई मालवाहतूक, आयात शुल्क आणि इतर करांमध्ये वाढ झाल्यामुळे किमतीत वाढ झाली आहे, असे एपीएमसीमधील फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे (Director Sanjay Pansare) यांनी सांगितले. याशिवाय, यूके, आखाती आणि मलेशियामध्ये वाढत्या मागणीमुळेही किमतीत वाढ झाली आहे, असेही पानसरे म्हणाले.

3 किलो आंब्याचा प्रत्येक बॉक्स 4000 ते 5000 रुपये प्रति बॉक्स आहे. पुढील आठवड्यापासून, शिपमेंट आठवड्यातून दोनदा अपेक्षित आहे. जसजसा पुरवठा वाढेल, तसतसा तो अहमदनगर, सुरत, बालगाव आणि इतर ठिकाणीही विकला जाईल, जिथे देवगड आंब्याला मागणी असेल, ते पुढे म्हणाले.

रत्नागिरीतून गेला अन् मालावी हापूस झाला

या मालावी आंब्याचे मूळ देवगड हापूसमध्ये आहे. १२ वर्षांपूर्वी रत्नागिरीतून कलमे करण्यासाठी हापूस आंब्याच्या कलम करण्यायोग्य लहान फांद्या (काड्या) मालावी देशात पाठवण्यात आल्या होत्या. त्यांची कलमे करून सुमारे २६ एकर शेतात लागवड करण्यात आली होती. पुढे क्षेत्रवाढ होऊन आता ६०० हेक्टरवर आंबा लागवड झाली आहे. या आंब्याला मालावी हापूस असेही म्हटले जाते. हे आंबे २०१८मध्ये प्रथम देशात आयात केले होते. २०१८मध्ये ४० टन आंबे नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये आले होते. ज्याची किंमत १५०० रुपये प्रति ३ किलो बॉक्स होती. २०१९ मध्ये सुमारे ७० टन आंबे पोहोचले आणि २०२० मध्ये करोनासाथीमुळे प्रति बॉक्स सुमारे ३००० रुपये दराने फक्त पंधरा टन आयात करण्यात आला होता, असे कृषी अभ्यासक संतोष सहाने यांनी सागिंतले.

देवगड हापूसला फटका नाही

मालावी देशात आंब्याचा हंगाम ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये असतो. या काळात येथे आंबे काढले जातात. त्यावेळी देवगड हापूस बाजारात नसतो. त्यामुळे देवगड हापूस आणि मालावी आंब्यामध्ये कोणतीही स्पर्धा असत नाही. कोकण पट्ट्यातील विविध भागांतून आगाप (पूर्व हंगामी) हापूस आंबा जानेवारीनंतर बाजारात येतो. या वर्षी यंदा डिसेंबरअखेरपर्यंत मालवी आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे.ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये मलावीमध्ये आंबे काढले जातात तेव्हा भारतीय आंबे मिळत नाहीत. त्यामुळे दोन्ही ऋतूंमध्ये संघर्ष होत नाही. भारतीय अल्फान्सो जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्राच्या दक्षिण आणि कोकण पट्ट्यातील विविध भागातून येतात.

Updated : 25 Nov 2022 12:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top