Home > News Update > चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी: देवेंद्र फडणवीस

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी: देवेंद्र फडणवीस

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी: देवेंद्र फडणवीस
X

आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्हातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Updated : 27 May 2021 3:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top