Home > News Update > #Lockdown2021: राज्यात अघोषित लॉकडाऊन, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

#Lockdown2021: राज्यात अघोषित लॉकडाऊन, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

#Lockdown2021: राज्यात अघोषित लॉकडाऊन, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
X

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात 5 एप्रिलपासून ब्रेक द चेन नावाने निर्बंध लागू केले आहेत. पण यावरुन अनेक ठिकाणी व्यापारी आणि दुकानदारांना विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुधारीत आदेश काढावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. काय म्हटले आहे या पत्रात ते पाहूया...

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र..

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाचतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील,असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लाकडॉऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली. मात्र ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊन सदृश निबंध घालण्यात आले. त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करताहेत.

हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रातील लोकांना याचा मोठा फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत, ते पाहता एकप्रकारे महिनाभराचा अघोषित लॉकडाऊनच आहे. त्यामुळे रिटेल, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय या सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाळण्यात आलेली नाही. वाहतूक (ट्रान्सपोर्टेशन) खुली ठेवताना गॅरेज आणि स्पेअर पार्टसची दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत.

त्यामुळे माझी विनंती आहे की, पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही. अशा पद्धतीने नव्याने निर्बंधांबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. आपण तत्काळ यासंदर्भात पाऊले उचलाल,असा विश्वास वाटतो.

Updated : 6 April 2021 7:17 PM IST
Next Story
Share it
Top