Home > News Update > राजीनाम्यानंतर अनिल देशमुख यांचे पुढचे पाऊल

राजीनाम्यानंतर अनिल देशमुख यांचे पुढचे पाऊल

राजीनाम्यानंतर अनिल देशमुख यांचे पुढचे पाऊल
X

परमबीर सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी तातडीने दिल्ली गाठली. आता हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय अऩिल देशमुख यांनी घेतल्याचे वृत्त बार अँड बेंच या कायदेविषयक घडामोडींचे वृत्त देणाऱ्या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

अनिल देशमुख यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर तातडीने दिल्ली गाठली आणि तिथे त्यांनी अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. परबमीर सिंग यांच्या आरोपांची प्राथमिक सीबीआय चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे, या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय देशमुख यांनी घेतला आहे. तसेच सिंघवी हे त्यांचे वकील असतील असेही या वृत्तात सांगण्यात आले आहे. राज्य सरकारने याआधीच निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे सीबीआयने FIR न नोंदवता तपास करावा असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. 15 दिवसात सीबीआयला आपला प्राथमिक तपास पूर्ण करावा लागणार आहे.

Updated : 6 April 2021 8:26 AM IST
Next Story
Share it
Top