Home > News Update > मराठा आरक्षण मागण्या मान्य : संभाजीराजेंनी ज्युस घेऊन उपोषण सोडले

मराठा आरक्षण मागण्या मान्य : संभाजीराजेंनी ज्युस घेऊन उपोषण सोडले

मराठा आरक्षण मागण्या मान्य : संभाजीराजेंनी ज्युस घेऊन उपोषण सोडले
X

सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनीज्युस घेऊन उपोषण सोडले. गृहमंत्री वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी आज चर्चा केली. छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र, संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमलबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले होते. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना वळसेपाटील यांन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं. आज, मुख्यमंत्र्यांच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंशी चर्चा केली. त्यानंतर, संभाजीराजेंनी ज्युस घेऊन उपोषण सोडले.

खासदार संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेतली. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन या मंत्र्यांनी संभाजीराजेंना देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर एका लहान मुलाच्या हातून फळाचा रस घेत संभाजीराजे यांनी आपण उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.

खासदार संभाजीराजे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे ही विनंती करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने संभाजीराजे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी संभाजीराजेंसोबत सविस्तर चर्चा केली. मात्र, आपण लेखी आश्वासनाशिवाय हे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी घेतली. चर्चेनंतर मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या सरकार मान्य करत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे यांना सांगितले.

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. संभाजीराजे यांनी केवळ सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी काही मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत, असे शिंदे म्हणाले. आता मागे काहीच ठेवायचे नाही असा निर्णयच सरकारने घेतला आहे. आता या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत आहेत, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर संभाजीराजे आपले आमरण उपोषण मागे घेतले.

Updated : 28 Feb 2022 1:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top