साखर कारखानदारांना अजित पवार यांचा सल्ला
टीम मॅक्स महाराष्ट्र | 4 Oct 2021 8:23 AM GMT
X
X
गुजरातप्रमाणे तीन टप्यात एफ आर पी दिल्यास शेतकऱ्याला सर्वात जास्त एफ आर पी देता येईल असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्याला एफ आर पी देण्यास उशीर करत आहेत. त्यात सर्वच कारखान्यांची एफ आर पी एकसारखी नाही, त्यामुळे गुजरातप्रमाणे तीन टप्यात एफ आर पी दिल्यास शेतकऱ्याच्या ऊसाला सर्वाधिक दर देता येणे शक्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. यंदा एफ आर पी देताना उसाची आवक किती आहे हे पाहून शेतकऱ्याला एफ आर पी द्यावा आणि कारखान्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
Updated : 4 Oct 2021 8:23 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire