Home > News Update > Tauktae Cyclone: मुंबईजवळ समुद्रात 400 लोकांचे प्राण संकटात, नौदलाच्या युद्ध नौका रवाना

Tauktae Cyclone: मुंबईजवळ समुद्रात 400 लोकांचे प्राण संकटात, नौदलाच्या युद्ध नौका रवाना

Tauktae Cyclone: मुंबईजवळ समुद्रात 400 लोकांचे प्राण संकटात, नौदलाच्या युद्ध नौका रवाना
X

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 'तौत्के' हे वादळ निर्माण झालं आहे. त्या दरम्यानच 'बॉम्बे हाय' या तेल क्षेत्राजवळच खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत. या ठिकाणी सुमारे 273 लोक अडकले आहेत. मुंबई शहरापासून हे अंतर 176 किलोमीटर अंतर दूर आहे.

या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाच्या INS कोची आणि INS तलवार या नौका रवाना झाल्या आहेत. या वादळाने देशभरात 7 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.


दरम्यान एका ठिकाणी मुंबईपासून 8 Nautical Miles अंतरावर 137 लोक अडकले आहेत. या लोकांना आणण्यासाठी INS कोलकाता रवाना झाली आहे.

दरम्यान या वादळाचं केंद्र मुंबई पासून 160 किलोमीटर अंतरावर असणार आहे. त्यामुळं समुद्र खवळला असताना या लोकांना वाचवण्याचं काम कठीण असणार आहे. त्यामुळे भारतीय नौदलाने भारतीय हवाई दलाची मदत घेतल्याचं समजतंय.

Updated : 17 May 2021 11:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top