Home > News Update > पी चिदंबरम महाराष्ट्र सरकारच्या मदतीला धावले, मोदी सरकारच्या मंत्र्याला दिला आरश्यात पाहण्याचा सल्ला



पी चिदंबरम महाराष्ट्र सरकारच्या मदतीला धावले, मोदी सरकारच्या मंत्र्याला दिला आरश्यात पाहण्याचा सल्ला



पी चिदंबरम महाराष्ट्र सरकारच्या मदतीला धावले, मोदी सरकारच्या मंत्र्याला दिला आरश्यात पाहण्याचा सल्ला


X

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीवरून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होते. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा असून केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा मिळत नसल्याचं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकार खासगी वसुलीत दंग असल्याचा आरोप केला होता. यावर माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी आता केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांना आरशासमोर उभे राहून स्वतःला काही प्रश्न विचारा असा सल्ला दिला आहे.




महाराष्ट्रातील कोव्हिडची गंभीर वस्तुस्थिती जाणून न घेताच केंद्र सरकार महाराष्ट्राला लक्ष्य करत आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत 80 % आरोग्य कर्मचा-यांचे लसीकरण केले आहे.

तर 73 % फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले आहे. जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात महाराष्ट्र देशात पाचवा आहे. ही सर्व आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीच आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा केला आहे का ? असा प्रश्न केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी आरशासमोर उभे राहून स्वतःला विचारावा.

असा सल्ला चिदंबरम यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना केला आहे. तसंच केंद्र सरकारने कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा न केल्यानं संपूर्ण कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ केला असल्याची टीका चिदंबरम यांनी केला आहे.


काय म्हटलं होतं डॉ. हर्षवर्धन यांनी?

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाने त्रस्त झालेला असताना महाराष्ट्र सरकार फक्त वसुलीमध्ये व्यस्त आहे. राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे .महाराष्ट्र सरकारने तर कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली. केंद्र सरकारने सातत्याने महाराष्ट्र सरकारला सल्ले दिले. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. असं म्हणत कोरोना लसीचा तुटवडा असल्याचा आरोपही निराधार असून राज्यातील काही नेते लसीचा तुटवडा असल्याचे सांगून राज्य सरकारचे कोरोना संसर्ग रोखण्यातील अपयश लपवत असल्याचाही आरोप हर्षवर्धन यांनी केला होता.

महाराष्ट्र सरकार खासगी वसुलीत दंग

महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या घालून महाराष्ट्र सरकार खासगी वसुलीत दंग आहे, असा आरोपीह हर्षवर्धन यांनी केला आहे.

भाजपशासित राज्यांचा विषय एका ओळीत संपवला

एकीकड़े महाराष्ट्रातील सरकारवर टीका करताना हर्षवर्धन यांनी भाजपशासित राज्यांमधील परिस्थितीचा ओझरता उल्लेख करत त्यांचा विषय एका वाक्यात संपवला आहे. कर्नाटक, गुजरात, राजस्थान या राज्यांनीही आपल्या आरोग्य व्यवस्था दर्जेदार कऱण्याचा सल्लाही दिला आहे.

Updated : 8 April 2021 3:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top