Live : मुख्यमंत्री गाडगीळ समितीचा अहवाल स्विकारणार का?
X
मुख्यमंत्री गाडगीळ समितीचा अहवाल स्विकारणार का?
कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात दरड कोसळल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला. यावर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व लोकांचं कायमचं पुनर्वसन केलं जाणार असल्याचं आश्वासन देत त्याचबरोबर या घटना रोखण्यासाठी तातडीने पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.
यावेळी त्यांनी यासंदर्भात आत्तापर्यंत आलेल्या सर्व अहवाल आपण मागितले असून त्यावर कठोर अंमलबजावणी करावी लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ग्लोबल वार्मिग मुळे या घटना घडत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीतून गाडगीळ समितीने काही शिफारशी सरकारला केल्या होत्या. त्यामुळे पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या प्रदेशात आता काही उद्योगधंद्यावर बंदी येऊ शकते. त्यामुळं मुख्यमंत्री हा अहवाल स्विकारणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.
मात्र, भविष्याच्या दृष्टीकोनातून गाडगीळ समितीच्या शिफारशी स्विकारणं महत्त्वाचं असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतात.






