'पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही' मुख्यमंत्र्यांना विश्वास
Max Maharashtra | 26 Aug 2019 11:33 AM GMT
X
X
"दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही त्यांची माजोरी व मुजोरी जनतेला माहिती असल्याने मतदार त्यांना थारा देणार नाहीत, असं सांगत, पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही.” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. महाजानदेश यात्रेनिमित्त बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसला धारेवर धरले.
“कोणत्याही यात्रेचे एक दैवत असते. मी काढलेल्या यात्रेचे दैवत हे राज्यातील जनता असून आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी व जनतेशी संवाद साधण्यासाठी मी महाजानदेश यात्रा काढलेली आहे. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही काँग्रेसच्या यात्रेकडे मात्र जनतेने पाठ फिरवली आहे.” असा दावाही त्यांनी केला.
Updated : 26 Aug 2019 11:33 AM GMT
Tags: amit shah article 370 bjp bjp india bjp maharashtra Cm Devendra Fadanvis CMO Maharashtra congress evm ban maha janadesh yatra narendra modi
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire