Home > News Update > चिनी वस्तूंवर आयात बंदीमुळे चीनचं 50 हजार कोटी रुपयाचं नुकसान ; कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा दावा

चिनी वस्तूंवर आयात बंदीमुळे चीनचं 50 हजार कोटी रुपयाचं नुकसान ; कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा दावा

चिनी वस्तूंवर आयात बंदीमुळे चीनचं 50 हजार कोटी रुपयाचं नुकसान ; कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा दावा
X

मुंबई : दिवाळीत भारतीय बाजारपेठत मोठ्या प्रमाणात चीनी वस्तू दाखल होत असतात, मात्र यंदा दिवाळीपूर्वीच चीनला मोठा आर्थिक फटका बसला आहे. देशात चायना सामानावर टाकण्यात आलेल्या बहिष्कारामुळे चीनचं जवळपास 50 हजार कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने सांगितले आहे की, देशात चायना मालावर बहिष्कार करण्याचं आवाहन केल्यामुळे यंदाच्या सण उत्सवाच्या तोंडावर चीनला 50 हजार कोटीचं आर्थिक नुकसान झालं आहे.

कॅटच्या म्हणण्यानुसार , देशभरात ग्राहकांची बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे, त्यामुळेच व्यापारी वर्गाला एका मोठ्या आर्थिक उलाढालीची अपेक्षा यंदाच्या उत्सावात आहे. दिवाळी कालावधीतील खरेदी-विक्री व्यवहारातून यंदाच्या वर्षी 2 लाख कोटी रुपयांची भर अर्थव्यवस्थेत पडेल, असा कॅटचा अंदाज आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही कॅटने चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केल्याने व्यापारी आणि आयातकर्त्यांनी चीनमधून आयात बंद केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून ग्राहकांनीही चायना मालाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, स्वदेशी, भारतीय सामानास बाजारात चांगली मागणी होत आहे.

Updated : 30 Oct 2021 12:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top