Home > News Update > राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट; रब्बी पिकांना धोका, बळीराजा चिंतेत

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट; रब्बी पिकांना धोका, बळीराजा चिंतेत

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट; रब्बी पिकांना धोका, बळीराजा चिंतेत
X

पुणे// मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील काही दिवसात राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झालं असून , याचा जबरदस्त फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हवामान विभागाने पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुण्यासह, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

30 डिसेंबरपासून पुढील तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Updated : 29 Nov 2021 11:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top