विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात चाळीसगाव मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. राजीव देशमुख यांचा कार्यकाळ वगळता या मतदार संघात भाजपचेच वर्चस्व होते. २००९ मध्य़े या मतदार संघातुन राजीव देशमुख यांनी बाजी मारली होती. पंरतू २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने नव्या कोऱ्या चेहऱ्याला या मतदार संघातून उमेदवारी दिली आणि उन्मेश पाटील यांनी या संधीच सोनं करत विजय मिळवली. राजीव देशमुख यांचा पराभव केला.
आमदार असलेल्या उन्मेष पाटील यांनी खासदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकलेही. त्यामुळे या वेळेला भाजपाकडून रमेश चव्हाण यांना तिकीट देण्यात आलं आहे.
2014 ला उन्मेश पाटील यांनी राजीव देशमुख यांचा पराभव केला.त्याप्रमाणे रमेश चव्हाण यांना जमेल का? पाहा... विशेष मुलाखत रमेश चव्हाण सांगत आहेत... मला आमदार का व्हायचंय?
Updated : 15 Oct 2019 8:52 AM GMT
Next Story