Home > News Update > सांगली सामूहिक आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी - रामदास आठवले

सांगली सामूहिक आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी - रामदास आठवले

सांगली सामूहिक आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी - रामदास आठवले
X

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील अंबिकानगरमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण या घटनेची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. "संवेदनशील मनाला हादरवून टाकणाऱ्या या सामूहिक आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

"सामूहिक आत्महत्या प्रकरणात दलित समाजतील दोन सख्ख्या भावांचे कुटुंब असून एकाच वेळी एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची ही घटना अत्यंत दुःखद आहे. या आत्महत्येमागे काय कारण आहे याचा शोध घेऊन या सामूहिक आत्महत्येस जबाबदार दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणीरामदास आठवले यांनी केली आहे.

प्रकरण काय?

आत्महत्या केलेले दाम्पत्य डॉक्टर आहे. त्यांच्या घरातील नऊ जणांनी एकाचवेळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या घरात तीन मृतदेह आढळले आहेत. या कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वन (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे.

म्हैसाळ येथील नरवाड रोडजवळ असलेल्या अंबिका नगर चौकालगत मळ्यामध्ये डॉक्टर वनमोरे हे कुटुंबासह राहत होते. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे आणखी एक घर होते. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. संशय आल्यानंचतर आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जणांचे मृतदेह आढळले. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Updated : 21 Jun 2022 1:07 AM GMT
Next Story
Share it
Top