Home > News Update > वडीगोद्री येथे सात एकर ऊस जळुन खाक; आठ ते दहा लाखांचे नुकसान

वडीगोद्री येथे सात एकर ऊस जळुन खाक; आठ ते दहा लाखांचे नुकसान

वडीगोद्री येथे सात एकर ऊस जळुन खाक; आठ ते दहा लाखांचे नुकसान
X

जालना : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे किरण तारख या शेतकऱ्याचा सात एकर ऊस जळुन खाक होऊन आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच उसाला आग लागल्याचा आरोप किरण तारख या शेतकऱ्याने केला आहे.

यापूर्वीही याच ठिकाणी चार वेळा विद्युत तारामुळे ऊस पेटला होता, अंतरवाली सराटी येथील शेतकरी किरण तारख यांच्या वडीगोद्री शिवारातील गट नं. १०७ मधील ७ एकर क्षेत्रावर गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आडसाली उसाची लागवड केली होती. आडसाली उस असल्याने उस जोमात आला होता. तारख यांच्या शेतातून वडीगोद्री ३३ के.व्ही.उप केंद्रातून शहागड फिडरची कृषी पंपासाठी वीज वाहिनी गेलेली आहे. तर याच शेतातून गावठाण फिडरची वीज वाहिनी गेली आहे.

किरण तारख यांच्या शेतात वीज वाहिनीचे जाळे असल्याने या १५ एकर क्षेत्रात २० विजांचे खांब आहेत.एलटी लाईट,११ केव्ही कृषी व ११ केव्ही गावठाण अश्या तीन वीज वाहिन्या तारख यांच्या शेतातून गेल्या आहेत.

दरम्यान या विजेच्या खांबावरून गेलेल्या तारांमधून ठिणगी पडून ऊस पेटला असल्याचे तारख यांचं म्हणणं आहे, या घटनेत त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. वारंवार अश्या घटना घडत असताना संबंधित विभाग मात्र यावर ठोस उपाययोजना करत नसल्याचे तारख यांचं म्हणणं आहे. त्यामुळे याबाबत संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना करून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

Updated : 20 Sept 2021 6:27 PM IST
Next Story
Share it
Top