- धोकादायक इमारतीतील रहिवाशांची महापालिकांनी जेवणखाण्याची आणि निवाऱ्याची व्यवस्था करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
- देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली उध्दव ठाकरे यांची विनंती
- MIM रस्त्यावर, औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराला विरोध
- नुपूर शर्मा यांना दणका, देशाची माफी मागा - सुप्रीम कोर्ट
- आता पुन्हा विधीमंडळाचे विशेष आधिवेशन: विधानसभा अध्यक्ष ठरणार
- ठाकरे सरकारने घेतलेत हे मोठे निर्णय ...
- नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या, व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांनाही धमकी
- पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या;मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा
- राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती होणार :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांची मदत

हिमालयात जाण्यावरुन दादांची पलटी
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत आघाडीने बाजी मारली असली तरी सोशल मिडीयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ट्रोल होत आहे. हरलो तर हिमालयात जाईल, या त्यांच्या घोषणेवरुन त्यांना टार्गेट केलं जात असताना चंद्रकांत दादा यांनी आता मी हरलो तर हिमालयात जाईल असं म्हटल्याची सारवासारव केली आहे.
X
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत आघाडीने बाजी मारली असली तरी सोशल मिडीयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ट्रोल होत आहे. हरलो तर हिमालयात जाईल, या त्यांच्या घोषणेवरुन त्यांना टार्गेट केलं जात असताना चंद्रकांत दादा यांनी आता मी हरलो तर हिमालयात जाईल असं म्हटल्याची सारवासारव केली आहे.
सोशल मिडीयावरुन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही चंद्रकांतदादांना आठवण करुन दिली आहे.
फुले ... शाहू ... आंबेडकर विचारांचा विजय ...
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 16, 2022
कोल्हापूर ची जागा जिंकली ...
शाहू महाराज कि jai
कोल्हापूर उत्तरची निडवणुक मोठ्या फरकानं जिंकत कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत. मात्र सोशल मिडीयावर चंद्रकांत पाटलांच्या घोषणेची चर्चा सुरु आहे. याबाबत त्यांना विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणतात, "नाना कदम लढले, तर तुमच्या तोंडाला फेस आला. मग मी लढलो तर…!"
"कोल्हापुरातून निवडणूक हरल्यास राजकारण सोडून हिमालयात जाईन", असं विधान चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर केलं होतं.आता कोल्हापूर उत्तरमधील निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पाटलांच्या त्याच विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यावर खुद्द चंद्रकांच पाटील यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
आमचे उमेदवार नाना पाटील हरले आहे. मी हिमालयात जाण्याची घोषणा मी हरलो तर हिमालयात जाईल अशी केली होती, अशी सारवासारव दादांनी केली आहे. कोल्हापुरात प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हिमालयाच्या मुद्द्यावरच चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. दोनच दिवसांपूर्वी इथल्या मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील प्रचारासाठी पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोषण करण्यात आला. 'दादा हिमालयात जावा' अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसोबत तिथून काढता पाय घेतला होता.