#गावगाड्याचे_इलेक्शन – ७ हजारांपेक्षा ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपचा दावा
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Jan 2021 12:22 PM GMT
X
X
मुंबई : राज्यात झालेल्या १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ७ हजारांच्य़ावर ग्रामपंचायती भाजपने जिंकल्याचा दावा केला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारपरिषद घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याचा दावा केला. कोकण म्हणजे शिवसेना असे समीकरण होते. मात्र, यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने हे समीकरण मोडीत काढल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग, वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. कोकणातील 70 पैकी 55 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. याशिवाय, राज्याच्या इतर भागांमध्येही भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा केशव उपाध्ये यांनी केला.
Updated : 18 Jan 2021 12:22 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire