Home > News Update > भारत जोडो यात्रा आज 97 किलोमीटरचा प्रवास करणार..

भारत जोडो यात्रा आज 97 किलोमीटरचा प्रवास करणार..

X

मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज 10 वा दिवस आहे. राहुल गांधी यांच्यासोबत मीनाक्षी नटराजन, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, त्यांच्या पत्नी अमृता सिंह आणि आमदार जयवर्धन चालताना दिसतं आहे. ही यात्रा 86 व्या दिवशी आगर-माळवा जिल्ह्यात पोहोचली आहे. सकाळी सहा वाजता जनाहा गावातून यात्रेला सुरुवात झाली. यानंतर आगर जिल्ह्यातील तनोडिया गावात सकाळी 10 वाजता ही यात्रा विश्रांतीसाठी थांबणार आहे..





आज हा प्रवास आगर जिल्ह्यातील सर्वात लांब अंतर कापणार आहे. 97 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा 3 दिवस आणि दोन रात्री येथे थांबणार आहे. येथून यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करेल.







भेटीदरम्यान राहुल गांधी बाबा बैजनाथ महादेव मंदिर आणि नलखेडा माँ बगलामुखी मंदिराला भेट देऊ शकतात. प्रवासाबाबत नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील एन्ट्री पॉइंटपासून शेवटच्या टोकापर्यंत झेंडे, बॅनर, पोस्टर लावले आहेत.





यात्रेच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि प्रशासनानेही तयारी केली आहे. यात्रेच्या सुरक्षेसाठी सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. येथे ठिकठिकाणी पोलिस तैनात आहेत.


Updated : 2 Dec 2022 6:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top