Home > News Update > ब्राह्मण समाजात जातीयवाद : जातपंचायतीमुळे कुटुंब बहिष्कृत

ब्राह्मण समाजात जातीयवाद : जातपंचायतीमुळे कुटुंब बहिष्कृत

ब्राह्मण समाजात जातीयवाद : जातपंचायतीमुळे कुटुंब बहिष्कृत
X

पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादाचे प्रकरण विद्येचे माहेर घर पुण्यातून पुढे आला आहे. जातीत लग्न न केल्याने एका कुटुंबाला तब्बल 23 वर्षांपासून वाळीत टाकल्याचा प्रकार घडला आहे. अखेर या त्रासाला कंटाळून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्री गौड ब्राह्मण समाजातील आहे. त्यांनी १९९८ मध्ये आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते.

हा समाज मूळचा राजस्थानातल्या किव्हाड पाली जिल्ह्यातला. एक तर मुलींचा जन्मदर घटला आहे. त्यात श्रीगौड ब्राह्मण समाजात मुलींची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे अनेक मुलांची चाळीसी उलटली तरी लग्न होत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्ती इतर जात आणि समाजातल्या मुली पाहतात. तर अनेक जणांचे प्रेमविवाह असतात. डांगे आणि त्यांच्या काही मित्रांचे विवाह दुसऱ्या जातीत आणि समाजात झाले आहेत. त्यामुळे त्यांना जात पंचायतीने वाळीत टाकले आहे.

याबाबत प्रकाश नेमीचंद डांगी (वय ४६, रा. हरपळे गल्ली, फुरसुंगी, हडपसर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ताराचंद काळूराम ओझा (रा. गंज पेठ), भरत नेमीचंद मेवाणी (रा. अरण्येश्वर), मोतीला भोमाराम शर्मा डांगी (रा. खिवाडा, जि. पाली, राजस्थान), प्रकाश लालूराम बोलद्रा उर्फ शर्मा (रा. पद्मावती), संतोष उणेचा (रा. भवानी पेठ), बाळू शंकरलाल डांगी (रा. पाषाण), भवरलाल डांगी (रा. मारवाड जंक्शन, राजस्थान), हेमाराम ओझा (रा. सिनला, जोधपूर, राजस्थान) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रकाश डांगी श्री गौड ब्राह्मण समाजातील असून ते रिक्षाचालक आहेत. १९९८ मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. समाजाकडून बांधण्यात येणाऱ्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या बैठकीसाठी ते गेले होते. बिबवेवाडीतील एका मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंचांनी डांगी यांना मंदिरातील बैठकीत कसा आला, तुला समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. तू निघून जा, असे सांगितले.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत थेट ब्राह्मण महासंघाला प्रश्न उपस्थित केला आहे. गौडब्राम्हण समजातील पोरानी पोट जातीतील मुलीशी विवाह केला म्हणुन त्याला जात पंचायतिनी समाजातून बहिष्कृत केले .. पोलिसात तक्रार दाखल .. ब्राम्हण महासंघ बोला … आम्ही काय चुकीचे बोलतो .. देशस्ताला नो कोकणस्थ #दवेबोला असे ट्विट आव्हाडांनी करत व्हिडीओ प्रसिध्द केला आहे.

निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव नव्हते. समाजाच्या विविध कार्यक्रमांचे निमंत्रण डांगी यांना देण्यात आले नव्हते. पद्मावतीतील एका सभागृहात नुकतेच स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे निमंत्रण डांगी यांना देण्यात आले नव्हते. समाजातील प्रत्येक कार्यक्रमांपासून डांगी यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. डांगी यांनी समाजात परत घ्या, असे पंचांना सांगितले. समाजाचे अध्यक्ष मोतीला शर्मा, भरत मावाणी यांच्याकडे अर्ज केला होता. समाजात पुन्हा यायचे असेल तर एक लाख २५ हजार रुपये दंड मागण्यात आला. अखेर डांगी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार २०१६ च्या सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा कलम ६ आणि ७ नुसार तसेच भारतीय दंडसंहिता कलम ३४ नुसार पंचांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Updated : 25 Jan 2023 8:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top