‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’
X
राज्यात सध्या अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना असं सोशल वॉर रंगलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा त्यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधातील ट्वीटमुळे चर्चेत आल्या आहेत आणि ट्विटवर शिवसैनिकही (Shivsena) ट्रोलिंग करत आहेत.
अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशुन “वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे” अशी घणाघाती टीका केली आहे. वर्षा बंगल्यातील भिंतीवरील उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील लिखाणाचं प्रकरण संपत नाही तोच अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांची खाती सरकारी बॅंकामध्ये वळवण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला अनुसरुन अमृता फडणवीस यांनी म्हटलं की, “सरकारने विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत. अशा पद्धतीने बँकेतील खाती वळवण्याचा निर्णय घेऊन सरकार मला आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहे,” असा आरोप अमृता फडणवीस यांनी इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना केला आहे.
Having a bad leader was not Maharashtra’s Fault - But Staying with one is ! जागो महाराष्ट्र ! https://t.co/uc9gmvVrNo
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 28, 2019