राजगृहावरील हल्ला: आंबेडकर कुटुंबाला Z+ सुरक्षा द्या: सचिन खरात
Max Maharashtra | 8 July 2020 2:34 PM IST
X
X
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. या प्रकरणानंतर खरात आरपीआय चे नेते सचिन खरात यांनी आंबेडकर कुटुंबाला Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाचे संविधान लिहून भारत देशाला लोकशाही दिली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या घरावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. म्हणून आंबेडकर कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा तात्काळ दयावी. अशी मागणी केली आहे.
Updated : 8 July 2020 2:34 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire