Home > News Update > अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णबला कोर्टात हजर राहावे लागणार

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णबला कोर्टात हजर राहावे लागणार

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णबला कोर्टात हजर राहावे लागणार
X

रायगड: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याची सुनावणी अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी सूनयना पिंगळे यांच्या न्यायालयात शनिवारी झाली. यावेळी अर्णवसह इतर दोन्ही आरोपी गैरहजर होते. त्यामुळे 10 मार्च रोजीच्या सुनावणीला तिन्ही आरोपींना हजर राहण्याचे कडक आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपी हजर न राहिल्यास तिन्ही आरोपीवर कडक कारवाई केली जाईल, असे निर्देश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्याबाबतचा अर्ज न्यायालयाकडे केला असल्याची माहिती विशेष सरकारी वकील ऍड प्रदीप घरत यांनी दिली. त्यामुळे अर्णव गोस्वामीसह फिरोज शेख, नितेश सरडा यांना 10 मार्चच्या सुनावणीवेळी हजर राहावे लागणार आहे.

रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात नव्याने दोषारोपपत्र 4 डिसेंबर रोजी दाखल केले होते. हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यासाठी 7 जानेवारी रोज सुनावणी झाली होता. पण यावेळी अर्णव गोस्वामीसह फिरोज शेख, नितेश सरडा हे गैरहज राहिले. तसेत शनिवारी झालेल्या सुनावणीवेळी तिन्ही आरोपीच्या वकिलांनी आरोपीना गैरहजर राहण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

अन्वय नाईक प्रकरणातील तिसरा आरोपी नितेश सरडा याने वकिलांनी सत्र न्यायालयात अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातून मुक्तता करावी यासाठी फेरविचार अर्ज दाखल केलेला आहे. या अर्जावर न्यायालयात 20 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाने सत्र न्यायालयात खटला वर्ग करण्यासाठी 10 मार्च ही पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. 10 मार्च रोजी अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा याना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Updated : 7 Feb 2021 4:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top