Home > News Update > साता बारा कोरा झाला नाही – देवेंद्र फडणवीस

साता बारा कोरा झाला नाही – देवेंद्र फडणवीस

साता बारा कोरा झाला नाही – देवेंद्र फडणवीस
X

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत आज अनेक महत्वाचे निर्णय घेतलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची २ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी केल्याची घोषणा आज सभागृहात केली. २९ सप्टेंबर २०१९ पर्यंतची सर्व थकीत कर्ज माफ करण्यात येईल. या मुद्द्यांवरुन विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे.

कर्जमाफीच्या घोषणेनंतर भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षावर भाजप चांगलीच बरसली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वास घात या सरकारने केला आहे. रांज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज होती मात्र, ती मदत झालेली नाही. पाहा काय म्हणाले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.....

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2993808410652026/?t=543

Updated : 21 Dec 2019 1:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top