Home > News Update > हराळवाडीत भरला बाल आनंद बाजार...

हराळवाडीत भरला बाल आनंद बाजार...

हराळवाडीत भरला बाल आनंद बाजार...
X

मोहोळ तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचे टोक असलेल्या हराळवाडीत स्वातंत्र्य प्राप्तीपासुन पहिल्यांदाच बाल आनंद बाजार भरला असून मुलांना शालेय ज्ञानाबरोबर व्यवहारज्ञान समजावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी येथे बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच बाल आनंद बाजार भरवण्यात आला होता. बाल आनंद बाजाराच्या माध्यमातून मुलांमध्ये शालेय ज्ञानासोबत व्यवहार ज्ञानाचे आकलन व्हावे, हा यामागचा उद्देश असल्याचे शिक्षक आणि ग्रामस्थांनी सांगितले आहे. या बाजारात सर्वप्रकारचा सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध होता. गावातील ग्रामस्थ व परिसरातील लोकांनी या बाजारात हजेरी लावून मोठ्याप्रमाणात खरेदी देखील केली. सुमारे २० हजार रुपयांपर्यंतची या बाजारात उलाढाल झाली असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक चांगदेव पवार यांनी सांगितले. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी बाजाराचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत मुख्याध्यापक चांगदेव पवार यांनी व्यक्त केले.

हराळवाडी गावांच्या इतिहासात पहिल्यांदाच बाल आनंद बाजार भरल्याने या बाजारात लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या बाजाराचे उद्घाटन अमोगसिध्द शेळके, प्रताप शेळके यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन बाल आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे, संदेश कुलकर्णी, गुरूनाथ पवार, गुरू मोटे, दिलीप शेळके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बाबर यांनी केले. तर आभार सचिन निरगिडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शहाजी माने,संजय ननवरे,संतोष माळगोंडे,पद्माक्षी मल्लाडे,यांनी परिश्रम घेतले.

Updated : 24 Jan 2023 10:17 AM IST
Next Story
Share it
Top