Home > News Update > अक्षयकुमार योगींना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल : संजय राऊत

अक्षयकुमार योगींना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल : संजय राऊत

अक्षयकुमार योगींना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल : संजय राऊत
X

आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन झाले. मुंबईत येताच त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली आहे. योगी आदित्यनाथ आणि अक्षय कुमारच्या या भेटीनंतर फिल्मसिटी मुंबई बाहेर नेण्याचा प्रयत्न होत असल्याच्या या चर्चांना उधाण आलं आहे. यावर, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत

अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लावला. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सवाल केला. योगी आदित्यनाथ हे साधू आहेत. महाराज आहेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानिमित्ताने ते काही कलाकारांना भेटले. अक्षयकुमारलाही भेटले. अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल, असा टोला हि त्यांनी यावेळी लगावला. कोपरखळी लगावतानाच मुंबईतील फिल्मसिटी एका रात्रीत उभी राहिलेली नाही. अनेक वर्षाची मेहनत आणि कष्ट त्यामागे आहेत. योगी मुंबईत आले. तसे तामिळनाडूतही जाणार आहेत का? तिकडेही मोठी फिल्मसिटी आहे. की फक्त योगींनी मुंबईशीच पंगा घेतलाय?, असा सवाल राऊत यांनी केला.

तुम्ही फिल्मसिटी उभी करण्यासाठी भिंती उभ्या कराल. पानंफुलं लावाल. पण सुरक्षेचं काय? मुंबईसारखी सुरक्षा तुम्ही देऊ शकणार आहात का? फिल्म सिटीबरोबर मुंबईची व्यवस्थाही घेऊन जाणार आहात का? असा सवाल करतानाच शेवटी मुंबई ही मुंबई आहे. फिल्मसिटी उत्तर प्रदेशात घेऊन जाणं मस्करी वाटते काय? असा सवालही त्यांनी केला. 'योगी आदित्यनाथ यांना मी इतकंच विचारु इच्छितो तुम्ही कोणताही मोठा प्रकल्प तयार करप इच्छिता तर कर. परंतु नोएडामध्ये जी फिल्म सिटी तयार केली होती त्याची आज काय परिस्थिती आहे. त्या ठिकाणी किती चित्रपटांचं चित्रीकरण होतं? याची माहिती जरा त्यांनी द्यावी,' असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

'दक्षिण भारतातील चित्रपट सृष्टी देखील फार मोठी आहे. पश्चिम बंगाल व पंजाबमध्येही फिल्मसिटी आहेत. योगीजी, त्या ठिकाणी जाऊन दिग्दर्शक, कलाकारांशी चर्चा करतील का? का मुंबईतच ते असं करणार आहेत?,' असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन झाले. मुंबईत येताच त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली आहे.

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरात यमुना एक्स्प्रेस-वे जवळ चित्रनगरी ( फिल्मसिटी ) उभारण्यात येत आहे. याबाबत योगी यांनी अक्षयकुमारसोबत चर्चा केली. तशी माहिती खुद्द योगी आदित्यनाथ यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अक्षय कुमार आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर खोचक टीका केली आहे.


Updated : 2 Dec 2020 1:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top