'केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकारने मेट्रोला स्थगिती दिली'
Max Maharashtra | 20 Dec 2019 6:25 AM GMT
X
X
भाजप आमदार आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नागपुर येथे विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे सरकारने स्थगिती आणलेल्या मेट्रो प्रकल्पावर भाष्य केलं. ही स्थगिती केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकारने दिली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“भाजप (BJP) सरकारने मुंबईतील जनतेसाठी इतक्या कमी दिवसात केलेल्या मेट्रो (Aarey Metro) प्रकल्पाला ठाकरे सरकारने स्थगिती दिल्यामुळे नुकसान भरपाई मुंबईकरांच्या माथीच मारली जाईल.'आरे'मध्ये मेट्रो कारशेडच एका दिवसाचे काम थांबवल्याने साडे चार कोटींचं नुकसान होत आहे. एकीकडे या सरकारने आरे मेट्रोला स्थगिती दिली आणि दुसरीकडे जंगल घोषीत करु म्हटलं आहे."अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/454407068603772/?t=126
Updated : 20 Dec 2019 6:25 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire