Home > News Update > शाळांपाठोपाठ राज्यातील महाविद्यालयं बंद राहणार

शाळांपाठोपाठ राज्यातील महाविद्यालयं बंद राहणार

शाळांपाठोपाठ  राज्यातील महाविद्यालयं बंद राहणार
X

राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता शाळांपाठोपाठ महाविद्यालयं बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालयं बंद राहतील, अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

आज बैठक झाल्यानंतर आज उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. "सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचं पालन करायला हवं असं ते म्हणाले.

Updated : 5 Jan 2022 2:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top