Home > News Update > दिलासादायक : राज्यातील 12 महापालिका क्षेत्रात दिवसभरात कोरोनाचा एकही बळी नाही

दिलासादायक : राज्यातील 12 महापालिका क्षेत्रात दिवसभरात कोरोनाचा एकही बळी नाही

दिलासादायक : राज्यातील 12 महापालिका क्षेत्रात दिवसभरात कोरोनाचा एकही बळी नाही
X

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामध्ये आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील 12 महापालिका क्षेत्रांमध्ये बुधवारी एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. बुधवारी १० हजार ५६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत ५६ लाख ७९ हजार ७४६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७% एवढे झाले आहे.तर एका दिवसात राज्यात कोरोनाचे १० हजार १०७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात दिवसभरात २३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९४% एवढा आहे. तर राज्यात सध्या १ लाख ३६ हजार ६६१ एक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील 12 महापालिकांमध्ये दिवसभरात एकाही कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. ही कोणती शहरं आहेत त्यावर एक नजर टाकूया...

उल्हासनगर

भिवंडी- निजामपूर

मालेगाव

अहमदनगर

धुळे

जळगाव

सोलापूर

औरंगाबाद

लातूर

अकोला

अमरावती

चंद्रपूर



Updated : 16 Jun 2021 3:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top