Home > News Update > सामाजिक द्वेषाविरोधात सद्भावना आंदोलन

सामाजिक द्वेषाविरोधात सद्भावना आंदोलन

सामाजिक द्वेषाविरोधात सद्भावना आंदोलन
X

राज्यात सध्या सामाजिक द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसते आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यभरातील सामाजिक बंधुभाव, सहिष्णुता मानणारे अनेक संघटना, संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, साहित्यिक, कलावंत यांनी सद्भावना आंदोलन केले. अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजां व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन प्रेमाचं, शांततेचं प्रतिक असलेले पांढरे वेश परिधान करुन, पांढरे कापड हाती धरुन देशातील प्रश्न प्रेमाने, शांततेने संवादाच्या माध्यमातून सोडविले जाऊ शकतात, असा विश्वास व्यक्त करीत शांततापूर्वक सद्भावना आंदोलनद्वारे समन्वयाचा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यभरातील विविध ठिकाणची दृश्य या खास संदेशासह मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी...आज समाजातील द्वेष वाढविण्याचे काम आरडाओरडा,गोंगाट करून घडविले जात आहे. ' ते ' आणि ' आपण ' अशी खोटी फूट पाडून समाजात द्वेष आणि तिरस्कार निर्माण करण्याचे काम चालू आहे. द्वेष, तिरस्कार आणि हिंसा ही गोंगाट आणि प्रचंड आरडाओरड करून करावी लागते. या सगळ्यामुळे सर्वजण अस्वस्थ आहोत. यापैकी अनेकांनी आपला अस्वस्थपणा शांततेच्या मार्गाने व्यक्त केला.




या विचारातून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने मुंबईतही अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर हातात पांढरा कागद घेवून सामाजिक कार्यकर्ते, वितारवंत, साहित्यिक, कलावंत यांनी मनातील अस्वस्थता शांतपणे उभे राहून व्यक्त केली.


यावेळी अभिनेत्री चिन्मयी सुमीत,अभिनेता संदीप मेहता,सामाजिक कार्यकर्ते विजय तांबे,आशुतोष शिर्के,शरद कदम,पत्रकार मुकुंद कुळे,सगुण सावंत,केतन कदम,राजश्री बने,विजय मोहिते, सकीना, मोहन थोरात, ॲड.प्रशांत जाधव,नरेश राजगुरू,दिनेश कदम, कवयत्री नीरजा,राजन धुळेकर ,राहुल वैद्य,गीता तांबे,गौरी कुलकर्णी,मनीषा कोरडे,साधना वैराळे,निखिल पवार,श्रीराम सोमण,रश्मी पटवर्धन,अमृता पटवर्धन आदी उपस्थित होते.

Updated : 1 May 2022 3:17 PM IST
Next Story
Share it
Top