रस्त्यात येणाऱ्या 57 झाडांवर कुऱ्हाड, वृक्षप्रेमींचा एल्गार
प्रणय ढोले | 3 Aug 2021 2:39 PM GMT
X
X
वर्धा जिल्ह्यात रस्ताच्या कामात येणारी 57 ते 58 वृक्ष तोडण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रितसर परवानगी घेऊन झाडं तोडल्याचा दावा केला आहे. पण आता यावरुन वाद सुरू झाला आहे. अपघाताला कारणीभूत ठरणारी ५७ ते ५८ झाडे तोडण्याचा निर्णय विभागाचे अधिकारी आणि वृक्ष बचाव समितीच्या सदस्यांनी केलेल्या संयुक्त सरर्वेक्षणात घेण्यात आला होता, असे सांगितले जात आहे. २९ जुलैपासून वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आली असून जवळपास ४५ झाडे तोडण्यात आली आहे. पण आता या वृक्षतोडीला आक्षेप घेतला गेला आहे.
Updated : 3 Aug 2021 2:39 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire