Home > News Update > वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातला आवाज अधिवेशनात घुमला

वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातला आवाज अधिवेशनात घुमला

वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातला आवाज अधिवेशनात घुमला
X

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या वाढवण बंदराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा आणि बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द करा अशा स्वरूपाचे बॅनर झळकवत निषेध व्यक्त केला आहे. आमदारांच्या या भूमिकेचे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनेही स्वागत केले आहे.

वाढवण बंदरासाठी केंद्र सरकारने नुकताच निधी दिली आहे. यासाठी कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या बंदरासाठीच्या पायाभूत सुविधा स्थापन केलेल्या कंपनीमार्फत विकसित केल्या जातील. त्यात समुद्रात भराव टाकून जमीन तयार करणे, बॅकवॉटरसाठी बांधकाम करणे, बंदरासाठी आवश्यक त्या दळणवळण सुविधा निर्माण करणे या कामांचा समावेश आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमार वर्ग देशोधडीला लागणार आहे, असा आरोप आमदार विनोद निकोले यांनी केला आहे. या विरोधात आज म्हणजेच मंगळवारी मुंबईच्या कफ परेड पसून डहाणूच्या झाईपर्यंतच्या कोळीवाड्यांनी बंदची हाक दिली आहे.

किनारपट्टीवरील सर्व गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर होणार आहे त्यास आमच्या आघाडीचा तीव्र विरोध आहे. वाढवण बंदर रद्द झाले पाहिजे कारण, त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यातील अल्प भूधारक शेतकरी देशोधडीला लागणार आहे. तिथे समुद्र किनारी राहणारा जो मच्छिमार आज वाढवण बंदर ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी समुद्रातील जैविक विविधता तिथे प्रजननासाठी अतिशय योग्य आहे. परंतु, वाढवण बंदर झाले तर हे संपूर्णतः नष्ट होणार आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या बंदराला प्रखर विरोध करत असून तो कायम राहणार आहे, असेही या आमदारांनी यावेळ सांगितले.

यावेळी आमदार सुनिल भुसारा यांनी स्थानिकांना देशोधडीला लावून जर विकासाचे आणि रोजगारचे गाजर कोणी दाखवणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही, यामुळे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीला नुसताच तोंडी नाही तर त्यांच्यासोबत रस्त्यावरची लढाई लढायलाही आम्ही तयार असल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान आमदार राजेश पाटील यांनीही या बंदराला आमचाही कडाडून विरोध असून येथील लोकांच्या भावना केंद्र सरकारने लक्षात घ्यायला हव्यात नियमांना बगल देवुन कोणी हा प्रकल्प आमच्यावर आमच्या बांधवावर लादनार असेल तर एक लोक प्रतिनिधी एक आमदाए म्हणून आम्ही येथील लोकांच्या पाठीशी ठाम आहोत असे सांगितले.

Updated : 15 Dec 2020 11:16 AM IST
Next Story
Share it
Top