Home > News Update > औरंगाबाद दौऱ्यात राज ठाकरेंच्या ताफ्याला दोनदा अपघात

औरंगाबाद दौऱ्यात राज ठाकरेंच्या ताफ्याला दोनदा अपघात

औरंगाबाद दौऱ्यात राज ठाकरेंच्या ताफ्याला दोनदा  अपघात
X

मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakrey) महाराष्ट्र दिनी(Maharashtra day) औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत.त्यासाठी ते आज पुण्याहुन निघाले होते.त्यांच्या ताफ्याला दिवसभरात २ अपघात झाले.

पहिला अपघात नगर जिल्ह्यात शहराच्या पुढे घोडेगावाजवळ झाला होता.आता दुसरा अपघात हा औरंगाबादजवळ झाला आहे.दुसरा अपघात हा मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या गाडीला झाला आहे.त्यात सुमारे दहाहून अधिक गाड्यांचे नुकसान झाले आहे.

सभेसाठी राज ठाकरे पुण्यातून शंभर गाड्यांच्या ताफ्यासह ते औरंगाबादला रवाना झाले होते. मात्र त्या सभेला पोहचण्यापूर्वी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना दोनदा अपघात झाला आहे.पहिला अपघात हा नगर शहराच्या पुढे गेल्यानंतर घोडेगावाजवळ झाला होता.त्यात ठाकरेंच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या.यात दिग्दर्शक केदार शिंदे(Kedar Shinde) आणि अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary)यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.

दुसरा अपघात हा औरंगाबादजवळ झाला आहे. त्यातही सुमारे दहाहून अधिक गाड्यांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यामध्ये पुणे शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या गाडीचाही समावेश आहे. यामध्ये कोणी जखमी असल्याचे वृत्त नाही. मात्र गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Updated : 30 April 2022 2:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top