Home > News Update > "ते" तुम्हाला मराठी माणसं वाटत नाहीत का? ; गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवर टीका

"ते" तुम्हाला मराठी माणसं वाटत नाहीत का? ; गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवर टीका

ते तुम्हाला मराठी माणसं वाटत नाहीत का? ; गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवर टीका
X

संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडूण आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक मराठी माणसं वाटत नाहीयेत का? असा सवाल करत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ही शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

बेळगावात निवडून आलेले उमेदवार शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का ? असं पडळकर म्हणाले. महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे व कलम ३७० चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे. दिल्लीतल्या मॅडमला व युवराजांना सत्तेसाठी खुष करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठी जणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुकशाहीचा वापर केला असही पडळकर म्हणाले.

वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप व तळतळाट तुम्हाला आता इथूनपुढेही भोगावा लागणार आहे.किंबहूना आपला पराभव म्हणजे बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या १५ कोटीच्या 'पेंग्वीन ' विकासाचा मॉडेल नाकारले आहे. हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादता व इतरांचा सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटलाय आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आलाय अशी खरमरीत टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Updated : 8 Sep 2021 7:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top