सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. त्यातच दुष्काळात शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने आमदार यशोमती ठाकूर यांनी सरकारला इशारा देत शेतकऱ्यांना पाणी देण्यास भाग पाडले. वर्धा नदीला पाणी सोडण्याच्या मागणीला सतत डावलले जात असल्याचा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला तसंच यावेळी त्यांचा आक्रमकपणा देखील पाहायला मिळाला. आ. ठाकूर यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
Updated : 15 May 2019 12:09 PM GMT
Next Story