मुक मोर्चाचे नायक कोण?
X
मराठा आंदोलना ची धग अवघ्या राज्याला व्यापुन राहीलेली आहे.५८ मोर्चे शांततामय मार्गा ने करून संपूर्ण जगाला एक आदर्श घालून देणारा समाज एकदम यू टर्न घेऊन हातघाई वर आलाय.मुक मोर्च्या च्या वेळी या मोर्च्याच्या मास्टरमाईंड ला शोधन्या साठीआहोरात्र काम करणारी शोध पत्रकारिता पुन्हा एकदा सक्रिय झालीय.आरक्षण, सरकारची भूमिका,समाजा ची भूमिका या वर वाकयुद्धां च्या फैरी झडत आहेत. सोशल मिडीया वर सरळ सरळ दोन गट पडले आहेत आणी एकमेकांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे.मराठा समाजा चे तथाकथित नेते, पुढारी दोन्ही गटांच्या निशान्यावर आहेत हे ही एक या लढाई चे वैशिष्ट्य च म्हणावे लागेल.
मुक मोर्च्या चा सुत्रधार नक्की कोण होता हा प्रश्न सांप्रत स्थितीत गैर आहे, मुक मोर्च्या हा उद्वेगाने केलेला उठाव होता आणी या उठावा ला ज्याच्या कडे बोट दाखविता येईल असा ठोस नायक नव्हता आणी म्हणूनच तो यशस्वी झाला. मोर्च्या ला मिळालेले बेफाम यश पाहून अनेक हौसे नवसे गवसे मी च तो अस युरेका युरेका म्हणत स्वत: च्या गळ्यात हारतूरे घालून घेऊ लागले पण सर्वसामान्य मराठ्या ने त्यांचे सर्वां समोर वस्रहरण केले. आणी याच कारणा मुळे अनेक वर्ष नाडला गेलेला, सेरभैर झालेला समाज हा एकजिनसी झाला, बोटावर मोजता येणार्या तोलामोलांच्या घराण्यां कडून हे नेतृत्व मराठा समाजा च्या खास उतरंडी तून ९६,९२ कुळी या परंपरेतून सतत कुणबी म्हणून हिणवलेल्या आणी नुसतेच समाजा चे लेबल लाऊन शिक्षण,नोकरी,व्यवसाय या प्रत्येक क्षेत्रात मार खाणार्या तरूणा च्या हातात या मोर्च्या चे नेतृत्व आले. त्याच्या साठी ही जिवन मरणाची लढाई असल्या मुळे तो खरा पेटून उठला आणी मग घरातील बायां
बापड्यां सोबत रस्त्या वर उतरला. बघतां बघतां आंदोलन चा वणवा पेटला, इतका की सगळ्या जगाने याची दखल घेतली. इतर समाज ही या आंदोलनात सहभागी झाले आम्हाला कोणाचे काहीच हिरावून घ्यायचे नाही हीच समाजाची प्राथमिक भूमिका होती
आणी मग इथेच समाजाचा घात व्हायला सुरूवात झाली तशी आपल्याला तोडा फोडा आणी मग झोडा या राजकारणा ची सवय आहेच याच न्यायाने आंदोलना मध्ये अपप्रवृत्ती शिरल्या अनेक फितूर वाचाळविर सुपारी घेऊन बेताल वक्तव्ये करू लागले. कळत नकळत मराठाविरूद्ध दलित. मराठा विरूद्ध मागासवर्गिय अस या आंदोलना ला स्वरूप दिल गेले. सर्वसामान्य मराठा या गोष्टी पासून अनभिज्ञ होता पण याचा परिणाम दृश्य स्वरूपात दिसू लागला मराठा विरूद्ध इतर हे समीकरण निवडणूकी च्या आखाड्या त फायदेशीर ठरतेय याचा अंदाज येव्हाणां सत्ताधार्यां ना आला आणी मग भिमाकोरेगाव पासुन अनेक घटना सातत्या ने घडायला लागल्या. हापूस आंब्या ना भलताच भाव आला आणी मग लाखो च्या संखे ने निघालेल्या मुक मोर्च्यां च फलित काय असा प्रश्न मराठी तरूणा ला पडला. तुम्ही कितीही आंदोलने करा आम्ही तुम्हाला खिजगणीत ही पकडत नाही आमची फसवणीशी अबाधित रहाणार या उद्दाम पणा मधून न्यायालयात मुदतीत प्रतिज्ञापत्र सादर न करणे, मगासवर्गिय आयोगाची कालमार्यादा आखुण न देणे, समाजा साठी शिक्षणा पासुन ते नोकरी पर्यंत च्या विविध फसव्या घोषणां ची निलाजरेपणे गाजर पेरणी करणे असे अनेक उद्योग घावूक प्रमाणात सुरू झाले.
या सगळ्यांचा स्फोट आजच्या आरजकते मध्ये झाला. आपण पुर्ण पणे फसविले जातोय या ची मराठा तरूणाला झालेली जाणिव ही अत्यंत वेदनादायी होती आणी या मधूनच ठोक मोर्च्या चा जन्म झाला. मुक मोर्चा चा कोणी नायक नव्हता तसाच ठोक मोर्च्या ला ही नायक नाही हे एक उस्फुर्त बंड आहे, आणी मग त्यातून मुख्यमंत्र्यांना पांडूरंगा च्या पुजेला आटकाव सारख्या घटना घडल्या पण यांत ही राजकारण करण्याची संधी मुख्यमंत्र्यां नी सोडली नाही वारीत साप सोडणार ही आकले ची दिवाळंखोरी करणारी हूल त्यांनी उठवून दिली हे कमी की काय म्हणून ट्विटर वर विठ्ठला च्या नावाने टिवटिव करून उरली सुरली वेशी ला टांगली आणी मग आंदोलन पेटले त्यांच्या इतर मंत्रीगणांनी त्यात बेताल वक्तव्यांचे यथासांग रॉकेल टाकले तर वाचाळ विर प्रवक्त्यांनी इतर पक्षां चे लोक आंलोलना ला हिंसक करत आहेत म्हणून आंदोलना ला वात लावली.
जितके आंदोलन पेटेल तेवढे मतांचे धृविकरण होईल ही सरकारची भूमिका दिसतेय पण यांत शेवटी भरडला जातोय तो डोक्याने गरम आणी मनाने निर्मळ असलेला सर्वसामान्य मराठा तरूण. या आंदोलना चे दोन बळी तर गेलेलेच आहेत दोन कूटूंबा ची वाताहात तर झालीच आहे पण हजारो तरूंणा वर ३०७ किंवा आणखीन भयानक कलम दाखल होत आहेत कदाचित या मुळे त्यांच पुढचे आयुष्य बायकोचे उरल सुरल सोनं किंवा जमिन गहाण ठेऊन कोर्टकचेर्यां मध्ये जाईल. समाजा च्या आडून अनेक समाजकंटक आपला स्वार्थ साधतील यांत न मोजता येणारे नुकसान सर्वसामान्यांचेच होईल आणी समाजाच्या इतर घटकां ची मिळणारी सहानभूती संतापा त परावर्तित होईल आणी सर्वार्थाने समाज एकटा पडेल. अगदी हेच आडाखे बांधून काही लोकांचे मार्गक्रमण चाललेय आणी त्यांना जे अपेक्षीत आहे ते च आपल्या कडून नकळत घडतेय या ची जाणीव आपल्याला लवकर झाली पाहीजे नाही तर मग महाराष्ट्रात आंबे खाऊन च मुले होतात यांवर कायमचे शिक्कामोर्तब होईल आणी आपण भाकरी च्या लढाई पेक्षा मनुवादा वर विवेचन करीत बसू.
आज पर्यंत आपण वापरले गेलोय फूकाच्या बढाया ने,फूकाच्या मोठाईकिने.आता परत त्याच वर्तुळात आपण सापडलोय आपण वारसा सांगतोय शिवराय, शाहू, फूले आंबेडकरांचा.फक्त आणी फक्त तीच आपली दैवते आहेत तेंव्हा त्यांनी सांगीतलेला मार्ग आपण कदापि ही सोडून चालणार नाही.आपल्या ला संघर्ष करायचाय तो बाबासाहेबांनी सांगीतलेल्या मार्गा ने आणी रयतेचा आदर करायचा आहे तो महाराजां प्रमाणे न की बसेस जाळून आणी आपल्याच पोलिस बांधवांवर दगडफेक करून आणी मोडतोड करून.महाड च्या तळ्या सारखं नाहीतर काळाराम मंदिरा सारखं नाहीतर मिठा च्या सत्याग्रहा सारखे आपण आंदोलन करून आपल्याला न्याय मिळवून घेऊ आणी तो आपण घेणारच अगदी नक्की पण त्या साठी थंड डोक्याने विचार करून निर्णय घेतला पाहीजे.मग आपल्या लक्षात येईल की आपण कोणाच्या छिप्या अजेंट्या चा हिस्सा तर होत नाही ना?आंदोलन करू पण सर्वसामान्यानावेठीला न धरता आपल्या जिवाचे बरे वाईट न करता. कृपया या ची काळजी घ्या ही च आपली बहिण म्हणून आपल्याला कळकळीची विनंती
-आपली डॉ हेमलता पाटील.






