पितृपक्षामुळे भाज्यांची मागणी वाढली, भाव वाढले
टीम मॅक्स महाराष्ट्र | 23 Sept 2021 6:59 AM IST
X
X
लहरी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि आता पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ, यामुळे भाज्या कडाडल्या आहेत. कांदा-बटाटा आणि कोबी वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर तेजीत आहेत. सध्या भाजी पाल्यांच्या किंमती ह्या वाढल्या आहेत. दिवसेंदिवस भाज्यांच्या किंमतीत वाढ होते आहे. मेथी,कांदा,चवळी, आदी भाज्यांच्या किमती ह्या 50,60 रूपयांनी वाढल्या आहेत. पावसामुळे आवकच कमी आहे. तर काही भागात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नासाडीमुळे सुद्धा ह्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यात पितृपक्षामुळे भाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आवक कमी आणि मागणी जास्त या समीकरणामुळे दर वाढले आहेत.
Updated : 23 Sept 2021 6:59 AM IST
Tags: Pitru Paksha vegitable price
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






