Home > मॅक्स व्हिडीओ > कामगार मंत्री सुरेश खाडेंच्या विरोधात गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष.

कामगार मंत्री सुरेश खाडेंच्या विरोधात गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष.

कामगार मंत्री सुरेश खाडेंच्या विरोधात गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष.
X

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मूळ तासगाव तालुक्यातील गाव पेड या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.या गावात भाजपचे मिरजचे आमदार व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगारमंत्री सुरेश खाडे यांचीच सत्ता आहे.मात्र राज्यात देशात सत्ता असणारे खाडे यांचे गावातील विकास कामांबाबत गावातील ग्रामस्थ नाराज असल्याने या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

पेड गावामध्ये वरची गल्ली याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाण्याची व्यस्था नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. संतप्त नागरिकांनी पेड येथील ग्रामपंचायतीवर आंदोलन केले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. गावातील तासगाव पंचायत समितीचे माजी उप सभापती प्रभाकर पाटील,खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास पाटील,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शेंडगे,पेड मल्हारराव वि.वि.कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन विजय शेंडगे, अभिजत शेंडगे,विश्वास शेंडगे,अविनाश शेंडगे आदी मान्यवर आंदोलनाला उपस्थित होते.

पेड हे गाव साधारणपणे नऊ हजार लोकसंख्येच गाव आहे.याठिकाणी बऱ्याच भागामध्ये गटारी नाहीत.पेड हे गाव सध्याचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे गाव आहे.मागील पंचवर्षी सुरेश खाडे यांचे मोठे बंधू कै.दत्तू खाडे हे या गावचे सरपंच होते.या वेळी गावात मोठी विकास कामे झाली.दत्तू खाडे यांनी गावातील बहुतांश टक्के गटारींची कामे केली होती.मात्र काही भागात गटारी त्यांना पूर्ण करता आली नाहीत.त्यातील एक भाग ही गावातील वरची गल्ली आहे.दरम्यान दत्तू खाडे यांची सत्ताअंतर झाले. यांनी गावातील लक्ष कमी करत त्यांच्या बिजनेस मध्ये ते बिजी झाले.काही दिवसांनी त्यांचा अल्पशा आजाराने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तद नंतर लोकांच्या समस्या जैसे थे अवस्थेत राहिल्या.याबाबात वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार येथील ग्रामस्थांनी केले.निवेदने देण्यात आली.

मात्र गेंड्याच्या कातडीचे असलेले प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. मात्र आता संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतल्या नंतर प्रशासन घडबडून जागे झाले.आंदोलनाच्या एक दिवस आधी आंदोलकांना भेटून दोन महिन्याचे गटारींचे काम पूर्ण करू असे लेखी पत्र देण्यात आले.या पत्रामुळे पूर्वनियोजित आंदोकांनी ग्रामपंचतीवर चिखलफेक न करता.फक्त घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करत आंदोलन केले.मात्र येत्या दोन महिन्यात गटाराचे काम पूर्ण झाले नाही तर, तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी बोलतांना अभिजित शेंडगे यांनी दिला.




Updated : 18 Jan 2023 2:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top